गाय वासरू नाते
साऱ्या नात्याहूनी थोर.
प्रेम वात्सल्याचा झरा
वाहतो चौफेर.
नात्यातील गोडवा
असाच अखंड वाढत जावा
वसुबारसेच्या पूजनाने
दिवाळीचा सण मंगलमय व्हावा
साऱ्या नात्याहूनी थोर.
प्रेम वात्सल्याचा झरा
वाहतो चौफेर.
नात्यातील गोडवा
असाच अखंड वाढत जावा
वसुबारसेच्या पूजनाने
दिवाळीचा सण मंगलमय व्हावा
आपण खरच खूप काही शिकाव .
आयुष्य जरी क्षणिक असल तरी
अवघ्या तीमिराला दूर करण्याचं स्वप्न
मनात नेहमीच फुललेलं असावं.
खरंच काळजाच्या कुपीत
हळुवारपणे जपावीत.
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना
त्यांच्यातील हिरवाई नव्याने पुन्हा अनुभवावी
जग जिंकल्याच्या थाटात राहता यावं
आयुष्यातील प्रत्येक आव्हान
असच हसतमुखाने पेलता यावं
त्याला मनसोक्त बरसून द्यावं
त्याच्या प्रत्येक सरीत भिजण्याचं सुख
आपलं आपणच क्षणोक्षणी अनुभवावं
अवघड रस्तेही सहज पार होतात.
प्रत्येक वळणावरच्या सावल्या ही मग
आपल्या यशाच्या भागीदार बनतात
प्रयत्नांची चाके आपली आपणच
फिरवावी लागतात
तेव्हा कुठे यशाचे पक्षी
आपल्या अवतीभवती मंजुळ गाणी गातात
यशाचे असंख्य मार्ग खुले होतात.
प्रामाणिकपणे चालणाऱ्या पावलांना
वाटेतील सावल्या सुद्धा दिशा दाखवतात.
कधीच थकत नाहीत.
आणि स्वप्नांचे परीघ भेदायला निघालेली पावलं
कधीच माघारी फिरत नाहीत
सन्मानाचा ही सन्मान व्हावा.
प्रगतीच्या पाऊलखुणानी
सतत नवा इतिहास लिहावा
निर्माण करता आलं पाहिजे.
आयुष्याचं गाणं कसं का असेना
पण सुरेल आवाजात ते गाता आलं पाहिजे
मनमुराद आनंद घेत राहायचं.
क्षण कसा का असेना त्याला
सकारात्मकतेचा आकार देत राहायचं.
अंगणी सडा सारवण
घरात आनंदाचं उधाण
सदा घरात नांदावे
सुख समाधान.
सोन्यापरी अस्तित्वाला
झळाळी तुमच्या यावी.
दुर्गुणांचा नाश होऊनी
यावी आयुष्याला झळाळी
उभं राहायला शिकलं की
आपोआप चालायला येतं.
आणि चालायला शिकलेल्या पावलांनी मग
यशाचं शिखर ही अलगद नजरेच्या टप्प्यात येतं.
आपण फक्त संयम बाळगून राहायचा.
येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी
सकारात्मक शिकत
आयुष्याचा प्रवास योग्य दिशेने करत राहायचा.
अवघड कामं ही
लिलया पार पडतात.
एका आत्मविश्वासाच्या जोरावरच
यशाच्या इमारती उभ्या राहतात.
दोन्ही ही हातांपुढे
नम्रता पूर्वक झुकता आलं पाहिजे.
आयुष्यातील प्रत्येक नात्याला
कृतज्ञ भावनेने जपता आलं पाहिजे.
प्रेम ,माया ,ममतेचा सागर
कधीच आटून देऊ नकोस.
पण मायेला उधाण आणताना मात्र
माणूस पारखून घ्यायला विसरू नकोस
जगात सहजतेने वावरता यावं
तुझं कर्तृत्व इतकं नितळ, स्वच्छ
आणि स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेल असावं.
मूलमंत्र आम्हाला दिला.
बापू तुमच्या मुळे आम्हाला
मानवतेचा अर्थ कळाला.
आस ठेवुनी स्वातंत्र्याची
कणकण देहाचा तुम्ही झिजवला.
भारतमातेचे वीर सुपुत्र तुम्ही
प्रणाम आमचा तुम्हाला.