पदर खोचून सज्ज राहा
हसत हसत लढण्यासाठी सदा.
आयुष्य सुद्धा तुझ्यावर
होईल बघ फिदा.
आराधना
काही वेचायच्या तर काही फुलायच्या राहून गेल्या.
आता वाटतंय वेचाव्या , शिकाव्या त्या गोष्टी.
पण नशिबाने आयुष्याच्या दोऱ्याच कापून नेल्या.
आराधना
सुगंधी अत्तर म्हणजे मैत्री.
डोळे झाकून विश्वास ठेवावा
असं हक्काच माहेर म्हणजे मैत्री.
धागा धागा विणत जातो.
संवादाच्या क्षणांनी
मैत्रीचा मार्ग फुलत जातो.
साथ देते ती मैत्री.
हात देते ती मैत्री.
आयुष्यभर मित्रासाठी जळत राहते.
अशी समई तील वात म्हणजे मैत्री.
म्हणूनच जपूया
हा मैत्रीचा अनमोल ठेवा.
तेव्हा कुठं अनुभवता येईल
मैत्रीतील सुखद गारवा.
आराधना
मनसोक्त बोलता यावं.
प्रत्येकाच्या आयुष्यात,
मैत्रीरुपी पान सतत,
हिरवाईने भरलेलं असावं.
आराधना
उद्या तुलाच साथ देतील.
रडशील ,पडशील ,धडपडशील तेव्हा
नव्यानं पुन्हा तीच तुला उभ करतील.
आराधना
शेवटच्या श्वासापर्यंत जपायचं.
कुणी होवो न होवो आपलं,
आपण मात्र त्याचचं होऊन जगायचं.
आराधना
मरण पाठीशी बांधून फिरतो
भिती कशाची वाटतं नाही
धगधगत्या चितेची ज्वाला
नव्याने जगण्याचे बळ देई
आराधना गुरव
म्हणत ना ,
तेव्हा त्याला
शांत राहू द्यावं.
त्याचं त्यालाच
आतल्याआत
अलगदपणे उमलू द्यावं.
आराधना गुरव
फरक कधीच पडत नसतो.
मनं एक झाली की मग,
सगळा भेद आपोआप
गळून पडत असतो.
आराधना गुरव