नव्या वर्षातील रंग नवे
नव्या आकांक्षा अन् स्वप्न नवे.
नव्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
मनात लढण्याचे बळ हवे.
सामर्थ्याने पंख पसरून
उंच आकाशी झेप घ्यावी
नव्या पर्वाचा स्वागताला
प्रत्येक उषा सज्ज व्हावी
नव्या आकांक्षा अन् स्वप्न नवे.
नव्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
मनात लढण्याचे बळ हवे.
सामर्थ्याने पंख पसरून
उंच आकाशी झेप घ्यावी
नव्या पर्वाचा स्वागताला
प्रत्येक उषा सज्ज व्हावी
खूप सकारात्मकता दडलेली असते.
बघणारा त्या प्रत्येक गोष्टीकडे कसा बघतो
यावरच तर भविष्याची पायवाट ठरत असते.
ओंजळीत विसावू पहात
तेव्हा त्याला खरंच विसावू द्यावं.
त्याला नक्की काय हवं आहे हे
त्याचं त्यालाच शोधू द्यावं
कधी कधी नवीन चांगल्या गोष्टीची सुरवात ठरते.
नव नव्या वाटा चोखंदळपणे हाताळण्याची
जणू आयुष्यचं तुम्हाला संधी देते
गुलमोहरासारख मनसोक्त बहराव
सकारात्मकतेच्या एका विचाराने
अवघ्या आयुष्याच सोनं व्हाव.
खरच खूप काही सांगून जातात.
तुझी पायवाट तूच उजळवण्यासाठीच जणू
त्या वाटा स्वतः ला गोठवून घेतात.
प्रत्येक दिवसाची नवी
सुरवात करून देतात.
प्रत्येक दिवसाकडे असच सकारात्मकतेने पहायचं
भविष्याच सोनेरी स्वप्न अखंड
मनातफुलवत राहायचं
ज्या खरंच तुमचं अख्खं
जग व्यापून टाकतात.
ध्येयापर्यंत जाण्याची प्रेरणा देऊन
तुमच्या ही नकळत तुमचा नवा इतिहास
लिहीत राहतात
चढणाऱ्या पावलांपेक्षा
स्वतः चा मार्ग स्वतः च शोधत रहायचा असतो
त्यानंतर मिळालेल्या यशाचा सुगंध मात्र
आपोआप चोहीकडे पसरतो
आधी उजेडाच बियाण पेरावं लागतं.
उगवत्या सूर्याच तेज
तेव्हाच तुमच्या मुखावर चमकत
तितकाच सुंदर त्या ध्येयापर्यंतचा प्रवास ही असावा.
त्या वाटेवरील प्रत्येक क्षण
इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा
प्रत्येक रंग वेगळा असतो.
आपण फक्त प्रत्येक रंगात
छान रंगून जायचं.
रंगपंचमीच्या दिवसाचा आनंद
प्रत्येक क्षणी घेत राहायचं
तिथे भावनांचा ओलावा ही जाणवावा
कळायचं म्हणल तर नुसत्या विचाराने ही
डोळ्यांना पाझर फुटावा
आपणही तिच्या प्रवाहाबरोबर
पुढे चालत राहायचं.
मनातलं ध्येय पूर्ण होईपर्यंत
आपल काम प्रामाणिकपणे करत राहायचं
साक्ष सह्याद्री देत असे.
प्रतापगडाचा पायथा ही मग
अभिमानाने फुलून येत असे.
तलवारीच्या पात्यास बघून
शत्रू थरथर कापीत असे.
शिवरायांचे मावळे आम्ही
अन्याया विरुद्ध लढता लढता
पंचप्राण देऊ आमचे
शब्द पेलायला हवा.
शब्द सारी गुतांगुत
शब्द मनीचे हितगुज
शब्द मनात राहण्या
शब्द सावराया हवा.
रात्रीच्या गर्भात जणू चांदणे फुलावे.
पडता पडता, रडता रडता
प्रत्येक थेंबाचे जणू फूल बनावे.
सुखाची मस्त तान मारता आली पाहिजे.
क्षण कसा का असेना
आयुष्यातील प्रत्येक क्षणाला
मनमुराद दाद देता आली पाहिजे
त्या प्रत्येक शब्दाचा सन्मान व्हावा.
ओठी उमटणाऱ्या प्रत्येक शब्दातून
सरस्वतीचा हुंकार ऐकू यावा
जेव्हा आपल्याच मनाचा आपल्या
मनाशी संघर्ष घडतो
आपल्या प्रगतीचा मार्ग मग
आपला आपल्यालाच गवसतो
काही ना काही पाऊलखुणा मागे उरतात तरी ही
त्या प्रत्येक पाऊलखुणापासून काहीतरी सकारात्मक शिकायचं.
आयुष्यातील प्रत्येक आव्हान हिमतीनं पेलायचं
खरंच तुम्हाला सुंदर बनवतात.
कुरूप तेच्या साऱ्या बेड्या तोडून
तुम्हालाच अद्वितीय बनवून टाकतात