फुलांच वेड असावच
पण काट्यांतील साैंदर्य ही
पाहता यावं.
त्यांना ही अलगद शब्दांत गुंफून
त्याचं सुरेल गाणं बनवता यावं.
पण काट्यांतील साैंदर्य ही
पाहता यावं.
त्यांना ही अलगद शब्दांत गुंफून
त्याचं सुरेल गाणं बनवता यावं.
आयुष्याच्या रंगरूपानुसार
त्या त्या बदलात स्वतःला
रंगवता यायला हवं.
थांबत नसतचं मुळी आयुष्य
म्हणून पुढे चालायला शिकायला हवं.
स्वतःच दिवा बनावं .
काजव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होऊन
आपली वाट आपणच शोधत राहावं
रोजच पाऊस पडतो.
म्हणूनच की काय
पावसाच्या प्रत्येक सरीतून
अनुभवलेला प्रत्येक क्षण
नव्याने कळतो.
अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न केले जातात.
हेच प्रयत्न तुम्हाला मग
तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातात.
नव्या स्वप्नांच्या ध्यासाने
पावलं वेगाने पडायला लागतात.
वाटेवरच्या अडचणी ही मग
फुलांप्रमाणे भासायला लागतात
अवघड गोष्टी ही सोप्या होऊन जातात.
समोर उभा राहिलेली आव्हानंही मग
हवेतल्या बुडबुड्यासारखी क्षणार्धात
विरून जातात.
तेव्हा स्वतःला बंद करून घ्यावं कोशात.
आपण नक्की कोण? याचं उत्तर मग
फुलपाखरू बनल्यावर
सापडत आपल्याच अंतर्मनात.
पाय घट्ट रोवून पुढे चालत राहायचं.
आपल्या स्वप्न पूर्तीसाठी
स्वतःच दिवा बनुन
अखंड तेवत राहायचं
त्याची वेदना काळजापर्यंत पोहोचते.
त्या क्षणी तुमच्या मनात
इतिहास घडवण्याची ठिणगी पेटते
मनात स्वप्न सूर्योदयाचे पेरावे.
जीव लावावा स्वप्नांना असा की
स्वप्न लेकरू बनुन मांडीवर खेळावे
देह वारकरी होतो.
मुखातून अभंगवाणी
मन गाई हरिपाठ.
जिथे खूण माणसाची
तिथेच पडे विठ्ठलाशी गाठ
इंद्रायणीचा गाभारा
भरे काठोकाठ
कुरवाळत बसलं की
तळ्यातल्या तळ्यातच
समुद्र वाटायला लागतो.
याने फार नुकसान नाही झाले तरी
प्रगतीचा मार्ग मात्र खुंटून जातो.
म्हणून त्यालाही कधीतरी
थोडा विसावा द्यावा.
विसवण्यात ही किती समाधान असतं
याचा अनुभव आपला
आपल्यालाच घेता यायला हवा.
नियतीशी दोन हात करत राहायचं.
आपला स्वाभिमान गहाण न टाकता
मनात परलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं.
सतत नव्याने वाचता यायला हवं
त्याच्याबरोबरचा क्षण कसा का असेना
त्याला सकारात्मकतेच लेबल लावून
आपल्या प्रगतीचा आलेख
उंचावत ठेवत
यशाचं शिखर गाठता यायला हवं
मैत्री करता आली की
आयुष्य सुकर होऊन जातं.
प्रत्येक क्षणाच मग आपोआपच
सुरेल गाणं बनतं.