मायेच्या शब्दांची एक फुंकर
आतून जळणाऱ्या प्रत्येक वेदनेचा
दाह कमी करते.
अन् तुमच्या मनातील जिद्दीची पालवी मग
त्या वेदनेतून पुन्हा नव्याने फुटू लागते.
आतून जळणाऱ्या प्रत्येक वेदनेचा
दाह कमी करते.
अन् तुमच्या मनातील जिद्दीची पालवी मग
त्या वेदनेतून पुन्हा नव्याने फुटू लागते.
खूप काही शिकता येतं.
नव्या सूर्याच्या निर्मितीचं रहस्य
जणू या अंधारातच उलगडता येतं
मोठमोठ्या अडचणी ही
मुंगी सारख्या लहान वाटू लागतात.
तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी जणू त्या
स्वतःच मागे सरून
तुमचा मार्ग मोकळा करून देतात
कुठेही अन् कशाही परिस्थितीत
मनसोक्त बहरता येतं.
नव्या आयुष्याचं नवं गाणं मग
आपोआपच ओठांवर येतं
अंधार सुद्धा आपल्याशी
आपसूकच बोलू लागतो.
वेड्यावाकड्या वळणातूनही मग
यशाचामार्ग दिसू लागतो
जगणं महत्वाचं हे कळलं की
आयुष्य सोपं होऊन जातं.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचं
प्रत्येक वळण मग
हवंहवंसं वाटू लागतं
खूप पडलेला असतो.
मात्र त्यातूनच आपला एखादा तुकडा
अलगद उचलता यावा.
त्याच्या पूर्ततेसाठीच मग
अवघा जन्म जगता यायला हवा.
आपण आपलं आपल्या वाटेने
पुढं चालत राहावं.
वाटेवरच्या प्रत्येक उन्हात
समाधान शोधून पहावं.
आता अजुन थोडच चालायचं आहे.
असं म्हणून निर्धाराने चालत राहायचं
आयुष्याच्या वळणावरचं प्रत्येक आव्हानं
असच ताकदीने पेलायाचं.
आभाळ अलगद हातात येतं.
तुमच्या मनानेच तुम्हाला मग
नियतीशी दोन हात करण्याचं बळ मिळतं
आभाळ सुद्धा अलगद
उतरून खाली येतं.
मनामनाचं ओझं सुद्धा मग
कापसासारखं हलकं वाटू लागतं
नव्याने सुरवात करायची.
उगवता सूर्य कसा का असेना
त्याला आत्मविश्वासाने
सामोरं जाण्याची तयारी
आपली आपणच करायची
सामर्थ्याने करत गेलो की
वाटेतील अडथळे ही
आपोआप कमी होतात.
प्रत्येक दिवशी
तुमची ओंजळ
यशाच्या सुगंधी फुलांनी
भरून टाकतात.
वाटेवरुन चालण्यापेक्षा
थोडंसं वाट बदलून पहावं.
येतील ते अडथळे पार करत
इतरांसाठी आपणच प्रेरणादायी ठरावं.
आपोआप कुठे बनतो
तो तर बनवावा लागतो.
तेव्हा कुठे अडचणींवर मात करत
प्रत्येक गड जिंकता येतो
आपली वाटचाल
तत्वानुसार आहे सुरू.
एक ना एक दिवस या वाटेनेच
वेगाने धावेल
तुमच्या यशाचा वारू.
प्रत्येक क्षणी ते स्वप्न
जगता यायला हवं.
प्रश्न नसतातच मुळी अवघड
फक्त उत्तर मिळेपर्यंत
प्रयत्न करायला शिकायला हवं
बहरण्याचा मूक संदेश देतो.
जणू अंधाऱ्या रात्रीनंतर होणाऱ्या
सूर्योदयाचे गोड गुपित सांगून जातो.
प्रत्येक क्षणाचा इतिहास बनतो.
वेदनेचा प्रत्येक क्षणही मन
मनाला गारवा देऊन जातो
आजचं जगणं का सोडायचं.
त्यापेक्षा हातात मिळालेला प्रत्येक क्षण
आनंदाने जगून आपलं आणि इतरांच
जगणंही सुंदर करायचं
सकलांनी रोज अनुभवावी
सुख समाधानाची वारी
अखंड चालू राहावी.
संपाव्या काळोखाच्या राती
उजळाव्या आशेच्या ज्योती
धरूनी कास नाविन्याची
गोडी वाढावी अक्षय तृतीयेची