कितीही थकलं तरी
जो अविश्रांतपणे
आपल्या वाटेने चालत राहतो.
यशाचा सूर्य फक्त
त्याच्यासाठीच उगवतो
आपल्या आपणच शोधाव्या लागतात
तेव्हा कुठे आपल्या यशाच्या
पाऊलखुणा उमटतात.
पावलं तयार झाली की
वाटेतील खाच खळग्यांची
वाटत नाही भीती.
म्हणूनच तर पावलांना
आपोआपच येऊ लागते गती
ऋतुचक्रातील कोणत्याच बदलांना
घाबरत नाही.
म्हणूनच की काय
कोणतीच वेदना त्याच्या आता
थाऱ्याला सुद्धा उभं रहात नाही
आजकाल मला खरंच आवडू लागलय.
कारण त्या शांत जगामुळेच तर मला
नवा सूर्य शोधण्याचं गुपित कळलय.
प्रत्येक ऋतु हसत हसत
झेलता आला की
आयुष्य सुखकर होऊन जातं.
पेलता न येणारं ओझं ही मग
चुटकीसरशी हलकं वाटू लागतं.
बघता आलं की
रणरणत्या उन्हातही आयुष्य
गुलमोहरासारख फुलून येतं.
आयुष्यातील प्रत्येक क्षणाच
तेव्हा आपोआपच सोनं होतं.
पण रोज थोडं थोडं का होईना
चालत राहायचं.
वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देत
मनात रुजलेल
स्वप्न पूर्ण करायचं.
विझतील दिवे.
आधाराचे ही निखळतील दुवे.
वाट मात्र तुझी तुलाच
आता चालायला हवी.
यशाची मालिका अखंड
चालू ठेवायला हवी.
सोबत असतातच असं नाही.
सोबत नसणारी
दूर असतातच असं नाही.
दिसण्या आणि असण्यातच
खरंतर खूप फरक असतो.
हाच फरक समजून घेऊन
आपला मार्ग आपणच ठरवायचा असतो.
दोन्हीही आता थकत नाही.
कारण त्यांनाही आता माहित झालंय
प्रामाणिक प्रयत्न करतो
त्याची ओंजळ कधीच रिती रहात नाही
त्याच्या चटक्याला कशाला घाबरायच
सावलीप्रमाणे उन्हाशीही मैत्री करून
त्याच्या हातात हात देऊन चालत राहायचं
नव्या उमेदीने जगायचा.
आजूबाजूच्या प्रत्येकाच्या मनातही
असाच सकारात्मकतेचा विचार पेरायचा.
आधी प्रवाहात उडी मारायला शिकावं.
कोडी काय उलगडतातच की
कधी ना कधी.
आपण फक्त संयम बाळगून राहावं
कुठून अचानक आशेचा
एक किरण उगवतो.
तुम्ही पेरलेल्या प्रत्येक स्वप्नासाठी
सुखद, सुखकर मार्ग बनवतो
मनात खोलवर साठवणूक करावी.
कारण त्या प्रत्येक क्षणातूनच तर मिळते
उंच भरारी मारण्यासाठी ऊर्जा नवी.
त्याचा दरवळ आपोआपच
सगळीकडे पसरतो.
दूर गेलेल्या वाटांनाही मग
हलकेच जवळ घेऊन येतो.
यशाची पायवाट आपोआप सुखद होऊन जाते
अडचणी होतात दूर अन्
यशाच्या फुलांनी
तुमची ओंजळ भरली जाते
तेव्हा मोठ्या वादळात ही मन स्थिर राहतं
दुःख विसावतं उंबऱ्याच्या बाहेर
अन् सुखाला घरात जाण्याची वाट दाखवतं.
ती स्वप्न झोपू देत नाहीत
आणि जी स्वप्न झोपू देत नाहीत
ती सत्यात उतरल्याशिवाय राहात नाहीत