एक हात विश्वासाचा.
एक हात मायेचा.
एक हात सहकार्याचा.
एक हात सामर्थ्याचा.
एक एक धागा गुंफून
मळा फुलतो मैत्रीचा.
आराधना
एक हात मायेचा.
एक हात सहकार्याचा.
एक हात सामर्थ्याचा.
एक एक धागा गुंफून
मळा फुलतो मैत्रीचा.
आराधना
चिमणी घरट आपलं विणत राहते.
स्वाभिमानाने जगण्याचा जणू मुक
संदेशच देत राहते.
मनानं थकून चालणार नाही.
आकाश मुठीत घेण्याची जिद्द असेल तर
छोट्या छोट्या आव्हानांना घाबरून
घाबरून मैदान सोडून पळून चालणार नाही.
आराधना
यशाची इमारत उभी राहते.
अथक प्रयत्नांच्या जोरावर
यशाने आपली ओंजळ भरत जाते.
आराधना
यांची ताकद असते खूप मोठी.
या ताकदीच्या जोरावरच
मोठमोठ्या आव्हानांशी सुद्धा
सहज करता येते दोस्ती.
आराधना
हा नशिबाचा भाग असतो.
आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहायचं.
अन् आपल्या प्रयत्नांपुढे नशिबाला च
गुडघे टेकायला लावायच.
आराधना
दिवसरात्र प्रामाणिकपणे धडपडत असतात.
ज्यांच्या डोळ्यात ते खुपत ते मात्र
सतत समोरच्याला मुद्दाम टोचत राहतात.
आराधना
अन् जुळू लागले यशाच्या संगीताचे सूर.
दूर नाही आकाश आता
जणू हेच सांगण्यासाठीच आला होता
संकटांचा महापूर.
आराधना
आयुष्यभर चढावी अन् उतरावी लागते.
तेव्हा कुठे यशाचे आकाश
स्वच्छ निरभ्र अन् मोकळे होते.
आराधना
खरं जगणं शिकवतो तो गुरू.
धीर देतो तो गुरू.
अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देतो तो गुरु.
म्हणूनच गुरु असावा नेटका
त्याने न करावा दगा फटका.
शिकवणुकीने त्याच्या
तुमच्या यशाचा झेंडा
अवघ्या जगी रहावा फडकता
आराधना
म्हणून आत्मसन्मान गुंडाळून ठेवायचा नसतो.
एक दिवस आपला नक्की येणार
अन् विजय सत्याचाच होणार
म्हणूनच तर आयुष्यभर सत्याच्या कास धरून राहायचं असतं.
आराधना
त्याचा साऱ्यांनाच लळा.
पंढरपुरी भक्तांचा
अवघा भरला हा मेळा.
नाम तुझे यावे ओठी.
जन्म माझा हा अवघा
जावा तुझ्या चारणापाशी.
संग तुझा नित्य लाभावा
अवघा देह विठ्ठल व्हावा.
मुखातून या सदा
विठ्ठल विठ्ठल गजर व्हावा.
विठ्ठल विठ्ठल गजर व्हावा
आराधना
होणारा प्रत्येक घाव
काही ना कशी शिकवून जातो.
प्रत्येक प्रसंगाशी लढण्या साठी
जणू दहा हत्तींच बळ देतो.
आराधना
आपण फक्त धीर धरून राहायचं.
सचोटीने जगण्याचं सूत्र मात्र
आयुष्यभर पाळायच.
आराधना
स्वसामर्थ्याचे अनेक पर्याय दिसू लागतात.
प्रामाणिक प्रयत्न केले की
यशाचे दरवाजे आपोआपच खुले होतात.
आराधना
आपण फक्त प्रयत्न करत राहायचं.
येणाऱ्या प्रत्येक अनुभवाच्या आधारे
पुढे जात राहायचं.
आराधना
संधीच्या शेतात उतरत नाहीत.
त्यांना यशाचा हुरडा
कधीच चाखायला मिळत नाही.
वादळ वाऱ्यातही नौका सहज तरुन जाते.
मनात पाहिलेल्या स्वप्नांचे गणितही मग
चुटकी सरशी सुटू लागते.
आराधना
विचारही खुजे होतात.
म्हणून मन नेहमी सागरा प्रमाणे विशाल असावं
म्हणजे विचारही आकाशाप्रमाणे व्यापक होतात.
आराधना
सारं आभाळ स्वच्छ वाटू लागतं.
उंच आकाशात झेपावण्याच स्वप्नही मग
पुन्हा मनात फेऱ्या मारू लागतं.
आराधना
तेव्हा त्याला मनसोक्त बरसून द्यायचं असतं.
आभाळ बरसून गेल्यानंतरच नवचैतन्य
आपल आपणच अनुभवायचं असतं.
आराधना
तेच अचूक हेरायचं.
आत्मविश्वासाच्या जोरावर
पुढे चालतं राहायचं.
आराधना
तिथूनच नव्याने सूरवात करायची.
निर्धाराने उभं राहून
पुन्हा उंच आभाळी झेप घ्यायची.
आराधना
कदाचित म्हणूनच ते मनात खोलवर आघात करतं.
पण मन जेव्हा सत्य स्वीकारत
तेव्हा नव्या उमेदीने पुन्हा जगायला तयार होतं.
आराधना
अडचणींचे डोंगर सुद्धा सहज पार करता येतात.
नवनवीन आव्हान झेलण्याच सामर्थ्य
या अडचणीचं आपल्याला देतात.
आराधना
समाधानी राहता आलं पाहिजे.
इतरांना काही देता आलं नाही तरी
त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी
हसू फुलवता आलं पाहिजे.
आराधना
तेव्हा अख्खं घर आनंदाने डोलू लागतं.
यशाच्या पाऊल खूणांनी मग
घरातलं प्रत्येक आभाळ भरून वाहू लागतं.
आराधना