Sunday, April 4, 2021

आभाळ


 आभाळ येतं भरून

अन् कधी कधी धुकं ही दाटून येतं.

भावनांच्या कोंडमाऱ्यात तेव्हा

जोडलेलं नातही गोठून जातं.

   वाट बघत राहायची मग

आभाळ लख्ख होण्याची.

तेव्हा कुठे जाणीव होते

मनाला मनाची.

                               अर्नदिप                     

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही