जगाशी प्रामाणिक राहता आलं नाही तरी.
स्वतः च्या मनाशी तरी प्रामाणिक राहावं.
स्वतः च्या चुकांची कबुली
किमान स्वतः ला तरी देऊन पहावं.
स्वतःच बनावं स्वतः च टीकाकार
अन् माझं काय चुकतय हे स्वतः लाच विचारावं.
आपल्याच चुकांची कबुली
कधीतरी स्वतः लाच देऊन पहावं.
तेव्हा कुठं विचार बदलेल.
विकृतीच्या जाळ्यातून मन
आपोआप बाहेर निघेल.
अर्नदिप

No comments:
Post a Comment