Wednesday, June 9, 2021

चार ओळी


 चार ओळी तुमच्यासाठी

लिहिताच नाही आल्या.

शब्द ही झाले कातर

अन् पापण्या ओल्या झाल्या.

 बाग गेला सुकून

आता बहर मागवा कोणाकडे

बहरण्यासाठी अमृत देणारा

झरा च आटून गेला.

पुन्हा नव्याने फुटो पालवी

अन् बहर पुन्हा तो येवो.

विचार सुमनानी तुमच्या

आमचा कणकण गंधित होवो.

                         अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही